UPDATES

728x90

468x60

header-ad

7 जानेवरी दिनविशेष।सरोजिनी बाबर।Sarojini Babar।dinvishesh।7january special day।


सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 या दिवशी झाला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बागणी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपूरमध्ये झाले. 1940 या साली त्या शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्या पुण्याला गेल्या. पुण्यामधील सर परशुरामभाऊ या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी मिळवली. पुढे जाऊन त्यांनी एम.ए. केले. पीएच.डी.ची पदवी सुद्धा त्यांनी मिळवली.


पारतंत्र्याच्या काळात भारतात स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांनी त्यावेळी जनजागृती केली. महिला असून देखील या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेऊन त्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राची लोकसंस्कृती कशी आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील जे साहित्य लिहून ठेवल आहे त्याचं संशोधन संपादन इत्यादी कामे त्यांनी अगदी चांगल्या पद्दधतीने केले.


सरोजिनी बाबर या चांगल्या पद्धतीने आपली मते मांडत असत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावर त्यांच्याकडे बोलण्याची कला चांगली होती. वक्तृत्व कला त्यांच्याकडे होती. त्या गायन सुद्धा करायच्या. त्यांनी त्यामध्ये सुद्धा काही काळ शिक्षण घेतले. गायना मधील थोर व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला त्यामध्ये गोविंदराव टेंबे,वच्‍सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे यांच्याशी त्यांची सतत भेट गाठ होत राहिली त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा त्यांना गायनाचे चांगले मार्गदर्शन लाभले.


आकाशवाणी कार्यक्रमांमध्ये सरोजिनी बाबर यांनी भाग घेतला आकाशवाणीवर त्यांनी लोकजीवनावर,लोक संस्कृती लोकगीत अशा विषयांच्या वर त्यांनी मालिका तयार केली. ती प्रसारित देखील केली. सरोजिनी बाबर यांनी रानजाई ही मालिका सुद्धा मुंबई दूरदर्शनवरून सादर केली.


सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या सभागृहाच्या सदस्या होत्या. त्याचप्रमाणे भारतीय राज्यसभा या सभागृहाच्या सुद्धा त्या सदस्या होत्या. समाज शिक्षण माला हे मासिक सुद्धा त्यांनी बरेच दिवस बरेच वर्षे त्यांनी चालवले. महाराष्ट्र राज्य लोक साहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. सरोजिनी बाबर यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह,ललित लेख,काव्यसंग्रह लिहिले.


मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसाहित्य संमेलन घडवून आणले. त्यामध्ये त्यांनी अनेक परिसंवाद यांचे नियोजन केले. लोककलांचे समाजातील लोकांनी ज्या कलांमध्ये कौशल्य प्राप्त केले. अशा कलांचे प्रदर्शन त्यांनी संमेलनामध्ये भरवले.


पुणे विद्यापीठ त्यांना डी.लिट. ही देऊन गौरवले. मराठा सेवा संघाचा विश्वभुषण पुरस्कार त्यांना दिला गेला. पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव हा पुरस्कार त्यांना मिळाला. राहुरी कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स याने त्यांचा गौरव केला.

« PREV
NEXT »

Facebook Comments APPID