रघुनाथ माशेलकर Raghunath Mashelkar यांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावी झाला. माशेलकर यांचे बालपण मात्र मुंबईत गेलं. मुंबई येथील पालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होत्या. त्यांच्यासाठी त्या सर्वस्वी होत्या. कोणतेही मिळेल ते काम करत माशेलकरांच्या आई पोटासाठी कमाई करत होत्या. शिवणकाम किंवा जे उपलब्ध असेल ते काम त्या करायच्या.
एकदा त्या असेच कामासाठी बाहेर गेल्या. ज्या ठिकाणी त्या कामासाठी गेल्या तेथे त्यांना काम मिळाले नाही. त्या कामासाठी तिसरी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. माशेलकरांच्या आईचे शिक्षण झालेले नव्हते. तेव्हा त्यांनी मनाशी निर्धार केला. आज मला शिक्षणाअभावी काम मिळाले नाही पण माझ्या मुलाला खूप शिक्षण देईन. त्यासाठी त्यांनी खूप काबाडकष्ट केले.
रघुनाथ माशेलकर अकरावीच्या परीक्षेत बोर्डामध्ये आले. पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येईना. तेव्हा आईच्या आग्रहामुळे त्यांनी पुढे शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या मार्गदर्शनाखाली माशेलकर आणि आपली पी.एच.डी.पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी युरोपमधील सल्फॉर्ड विद्यापीठात जाऊन संशोधन केले.
डॉ. माशेलकर यांनी एचडी तर मिळवली त्याचबरोबर नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा संशोधनाद्वारे एक वेगळी वाट निर्माण केली. अनेक डॉक्टरेट मिळाल्या. 38 हून अधिक संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. १८ हून अधिक पुस्तके आणि २८ हून अधिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत.
हळदीचे उपयोग भारतामध्ये फार पूर्वीपासून करत आलेला आहोत जखम झाल्यानंतर त्यावर हळद हा एक रामबाण उपाय आहे हे पूर्वीपासूनच सर्व जगाला माहित आहे असं असतानासुद्धा एके दिवशी त्यांच्या वाचनात बातमी आली. हळदीचा औषधी उपयोग करण्याचे हक्क अमेरिकेने घेतले आहेत बातमीत होते. डॉक्टर माशेलकरांना खूप वाईट वाटलं भारतामध्ये अनेक पिढ्यांपासून चालत आलेले हे हळदीचे उपयोग त्यांना गप्प बसू देईना. त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. त्यांनी त्याच्यासाठी अनेक कागदपत्रे पुस्तके वापर करून हळदीची ही लढाई जिंकली.
हळदीच्या बाबतीत हा प्रकार घडला. तसाच प्रकार तांदळा मधील बासमती बाबत घडला. त्याविरुद्ध त्यांनी पेटेंट खेचून आणला. आणि म्हणून या देशातील एखादी चांगली गोष्ट ते दुसऱ्या देशामध्ये जात असेल तर यासाठी जागरूक व्हायला पाहिजे. आणि हा माणूस त्यांनी या दोन्ही लढाई जिंकल्या.
डॉ. माशेलकर यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान सुद्धा मिळाले. त्यांना रॉयल सोसायटीचे फेलोशिप मिळाली. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण त्यांना मिळाला. पद्मविभूषण सुद्धा त्यांना मिळाला. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधना महामंडळ याचे निदेशक सुद्धा त्यांना पद मिळाले आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार shanti swarup bhatnagar award त्यांना मिळाला.
[su_button style="glass" background="#d60000" color="#fcfcfc" size="8" icon_color="#020406" text_shadow="0px 0px px #000000"]ठळक घडामोडी[/su_button][su_expand link_color="#d60000" link_align="center" more_icon="icon: chevron-circle-down" less_icon="icon: chevron-circle-up"]